V. P. Kale’s quotes in Marathi reflect his deep understanding of human nature and his ability to distill complex emotions into concise and impactful words. Whether it is about love, self-reflection, or the pursuit of happiness, his quotes resonate with readers, encouraging introspection and self-discovery.
In this compilation of V. Pu. Kale’s quotes in Marathi, we delve into the treasure trove of his wisdom. These quotes serve as a reminder of the beauty and complexity of life, provoking thought and inspiring readers to explore the depths of their own emotions and experiences.
व्ही.पी. काळे यांचे मराठीतील कोट्स त्यांच्या मानवी स्वभावाचे सखोल आकलन आणि गुंतागुंतीच्या भावनांना संक्षिप्त आणि परिणामकारक शब्दांत मांडण्याची त्यांची क्षमता दर्शवतात. मग ते प्रेम, आत्म-चिंतन किंवा आनंदाच्या शोधाबद्दल असो, त्याचे कोट्स वाचकांना प्रतिध्वनित करतात, आत्मनिरीक्षण आणि आत्म-शोधाला प्रोत्साहन देतात.
व्ही. पु. काळे यांचे मराठीतील कोट्स विचारांना उत्तेजन देतात आणि वाचकांना त्यांच्या स्वत: च्या भावना आणि अनुभवांची खोली शोधण्यासाठी प्रेरणा देतात.
Collection of V. P. Kale’s quotes in Marathi

आपलं कुणी अनुकरण
किंवा द्वेष करायला लागलं
की समजावं आपला उत्कर्ष
होतोय..
व. पु. काळे

आपण हरवण्यासारखं..
आयुष्यात जरूर घडायला हवं,
कारण अशा स्थळावरून
परतताना
माणूस ‘माणूस’ राहत नाही.
परतून येतं ते चैतन्य!
व. पु. काळे

सगळे वार परतवता येतील
पण अहंकारावर झालेला
वार परतवता येत नाही,
आणि पचवताही येत नाही..
व. पु. काळे

माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच नाही मिळालं तर?
याची त्याला भीती वाटते..
व. पु. काळे

वाहतो तो झरा आणि थांबतं ते
डबकं !
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस!
व. पु. काळे

सुरुवात कशी झाली यावरच
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून
असतो..
व. पु. काळे

औदार्य म्हणजे तुमच्या
क्षमतेपेक्षा अधिक देणं
आणि आत्मसन्मान म्हणजे
तुमच्या गरजेपेक्षा कमी
घेणं..
गंजण्यापेक्षा झिजणे
केव्हाही चांगले..
व. पु. काळे

संध्याकाळच्या
संधीप्रकाशातही जो
टवटवीत राहीला त्याने
दिवस जिंकला..
व. पु. काळे

पाण्यात राहायचे तर
माश्यांशी नुसती मैत्री करून
भागत नाही तर स्वतःला
मासा बनावे लागते..
व. पु. काळे

चुकतो तो माणूस आणि चुका
सुधारतो तो देवमाणूस..
तुम्ही आयुष्यात किती माणसे
जोडली यावरुन तुमची श्रीमंती
कळते..
व. पु. काळे
V. P. Kale, or Vasant Purushottam Kale, was a renowned Marathi writer, playwright, and essayist. Born on September 1, 1930, in the city of Pune, Maharashtra, V. P. Kale made a significant contribution to Marathi literature and left an indelible mark on the literary landscape of Maharashtra.
Kale’s writings often explored the intricacies of human emotions, relationships, and societal norms. His works resonated with readers from various walks of life, capturing the essence of the human experience with profound insight and sensitivity. Whether through his thought-provoking essays, plays, or quotes, Kale had a unique ability to connect with readers on a deep emotional level.
The simplicity and authenticity of Kale’s writing style were key factors in his widespread appeal. He had a knack for expressing complex ideas in a relatable and accessible manner, making his work accessible to both literary enthusiasts and the general public. Kale’s writings touched upon diverse themes, including love, friendship, social issues, and the complexities of human nature.
One of the notable aspects of V. P. Kale’s literary contributions is his extensive collection of quotes. These quotes have become a source of inspiration and contemplation for many. They encapsulate profound truths and observations about life, offering readers a fresh perspective on various aspects of human existence.

भूक आहे तेवढे खाणे ही
प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा
जास्त खाणे ही विकृती आणि
वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही
संस्कृती..
व. पु. काळे

आपण किती पैसा मिळवला
यापेक्षा, तो खर्च करून आपण
किती समाधान मिळवले, हे जो
पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती
असतो..
व. पु. काळे

आयुष्यातला सर्वात
मोठा आनंद म्हणजे, जे
तुम्हाला जमणार नाही असं
लोकांना वाटतं ते साध्य
करून दाखवणं..
व. पु. काळे

प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर
असतंच. ते सोडवायला कधी
वेळ हवा असतो, कधी पैसा
तर कधी माणसं. या तिन्ही
गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम कधी
अस्तित्वाच नसतो..
व. पु. काळे

छान राहायचं.. हसायचं !
पोटात ज्वालामुखी असतांनाही,
हिरवीगार झाडं जमिनीवर
दिसतातच ना ?
व. पु. काळे

अनेक समस्या त्या क्षणी
सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या
लागतात. थोडा अवधी
लोटल्यावर मग कायमचा उपाय
शोधावा..
व. पु. काळे

ज्याच्याशी लढायचंय
त्याचा पूर्ण परिचय असावा,
हा युद्धाचा पहिला नियम
आहे..
व. पु. काळे

चालतांना विचाराला
आणि विचारामुळे
चालण्यास गती मिळते..
व. पु. काळे

साथीदाराला सुधारण्याच्या
खटाटोपात पडण्यापेक्षा
त्याला वळसा देऊन पुढे जाणे चांगलं..
कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं
वागणं योग्यच असतं..
व. पु. काळे

मैत्रीत न पटणाऱ्या
गोष्टीकडे
दुर्लक्ष करण्याची शक्ती
मिळवायची असते..
कोणी कुणासाठी किती
त्याग केला
ह्याचा हिशोब आला कि
आंब्याच्या झाडाने
आपला मोहर येण्याचा
काळ संपला हे जाणावे..
व.पु. काळे
व्ही.पी. काळे, किंवा वसंत पुरुषोत्तम काळे, हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार आणि निबंधकार होते. 1 सप्टेंबर 1930 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात जन्मलेल्या व्ही. पी. काळे यांनी मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक परिदृश्यावर अमिट छाप सोडली.
काळे यांच्या लेखनात अनेकदा मानवी भावना, नातेसंबंध आणि सामाजिक रूढी यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्यात आला. मानवी अनुभवाचे सार प्रगल्भ अंतर्दृष्टी आणि संवेदनशीलतेने टिपून त्यांची कामे जीवनाच्या विविध क्षेत्रातील वाचकांना गुंजतात. विचारप्रवर्तक निबंध, नाटके किंवा अवतरण यातून काळे यांच्याकडे भावनिक पातळीवर वाचकांशी जोडण्याची अनोखी क्षमता होती.
काळे यांच्या लेखनशैलीतील साधेपणा आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्या व्यापक आकर्षणाचे प्रमुख घटक होते. त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या कल्पना सुसंगत आणि सुलभ रीतीने व्यक्त करण्याची हातोटी होती, ज्यामुळे त्यांचे कार्य साहित्य रसिक आणि सामान्य लोकांसाठी सुलभ होते. काळे यांच्या लेखनात प्रेम, मैत्री, सामाजिक समस्या आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत अशा विविध विषयांना स्पर्श केला.
व्ही.पी. काळे यांच्या साहित्यिक योगदानातील एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यांच्या अवतरणांचा विस्तृत संग्रह. हे कोट्स अनेकांसाठी प्रेरणा आणि चिंतनाचे स्रोत बनले आहेत. ते जीवनाविषयी सखोल सत्य आणि निरीक्षणे समाविष्ट करतात, वाचकांना मानवी अस्तित्वाच्या विविध पैलूंवर एक नवीन दृष्टीकोन देतात.

दुसऱ्याचं मन ओळखणं सोपं..
स्वत:चा विचार करतांना क्षणभर
दुसऱ्याचं मन दत्तक घ्यायचं कि झालं..
व. पु. काळे

नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण
ठेवते, त्याप्रमाणेच कुणाचा सहवास
लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, याचं उत्तर पण
नियतीजवळच असतं..
व.पु. काळे

हट्ट स्वतःचा आणि तो पुरवायचा हक्क
इतरांजवळ म्हणजे बालपण…
व पु काळे…

हवेत ऑक्सिजन असतोच पण माशाला
पाण्यातलाच ऑक्सिजन शोषून हवा असतो..
मला तूच हवी होतीस.. आणि एक व्यक्ती नियती
एकदाच जन्माला घालते..
व. पु. काळे

जादू करून पैसा निर्माण करता
येत नाही, पण पैसा असला, की
कोणती जादू करता येत नाही… ?
जिथं माणसे विकत घेता येतात,
तिथं वस्तुंची काय कथा…..?
व. पु. काळे

विरोधक
एक असा गुरु आहे
जो तुमच्यातील कमतरता
परिणामांसह दाखवून देतो
– व. पु. काळे

मुलगी लग्नाशिवाय सांभाळायची म्हणजे
पदरात धगधगती ज्वाळाच बाळगण्यासारखं..
अनेकांचा डोळा.. किती जपणार?
व पु काळे

प्राविण्य
मिळविलेल्या माणसाला
कोणतीही चूक करायची
आयुष्यात सवलतच मिळत नाही
व पु काळे

कोणतंही यश सहजासहजी
मिळत नाही…
आयुष्यातल्या अनेक
आनंदाकडे पाठ फिरवून,
वर्षानुवर्ष साधना
करावी लागते….
– व. पु. काळे

आपल्याला न आवडणारे
विचारही आपल्यावर
हकूमत गाजवून
जातात..!
व. पु. काळे

काळ
बदललाय..
भावनाप्रधान स्वभाव
हा आता गुण राहिलेला नाही..
तो गुन्हा आहे, शाप आहे..
आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो
तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा
गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा
कटपणा दाखवेल
ह्याचा भरवसा राह्यला नाही..
व पु काळे..

सगळ्या शरीरात जसा
लहानातल्या लहान
अवयवात विसंगती निर्माण
झाल्यावर ठणका पसरतो,
तसचं कुटुंबातली एक व्यक्ती
अस्वस्थ असली म्हणजे
सगळ्या कुटुंबाचं होतं..
व पु काळे….

तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही.
हे गुण खळखळ न करता मान्य करणारा
समाज तुमच्याभावती जमणं,
याला महत्व आहे..
गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण
होऊन बसलंय..
व .पु. काळे

आम्ही जाऊन येतो…
हे सांगण्यासाठी घरात मागे
कुणीतरी असणं, यात केवढा
आनंद आणि आधाराची भावना
असते.
व. पु. काळे

ऑफीस संपल्यावर..
ऑफीस संपल की घर… घरून निघालं की
ऑफीस… वाचनाचं वेड नाही
संगितचं आकर्षण नाही गप्पांचा छंद नाही
फीरायला जाण्याची आवड नाही
माणूस रिकामा असला की काय
करणार मग? माझ्या मागे मागे असतात
मी काय करते हे सतत पहात ऱ्हायचं
काही चुकलं साडलं लवंडलं की ओरडायचं…
– हे असं आयुष्य कीती भगीनीच्या वाट्याला
आले असेल? अभिरुची संपन्न नवरा मिळावा
अशी एकूणएक स्त्रियांची मागणी नसेल…
त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात
पण तो कीमान माणूस तरी असावा
ही अपेक्षा गैर आहे का..?
व पु काळे….

मनाला पटेल असं वागायचं
ह्याचा अर्थ सगळ्यांशी वैर
असा थोडाचं आहे ?
उलट सगळ्यांवर प्रेम करण्याची
ही साधना आहे. वपुप्रेमी चाहते
संकलन : प्रशांत साळवे
मन शुद्ध करण्याचा अभ्यास आहे.
तुकोबा वेगळे काय सांगतात ?
मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचे कारण ।।
व. पु. काळे

नियती माणसाला कोणत्या तरी दालनात
शिखरावर नेऊन पोहोचवते आणि त्याचा,
त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी,
जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच
माणसाला अगदी सामान्य, अगदी क्षुद्र
करून सोडते. एका माणसाला छोटा करून
तो दुसऱ्याला मोठा करत नाही, तर एकाच
माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं
मोठा करते.
व. पु. काळे

बहुतेक घरी तापट नवऱ्याला थंड रक्ताची
बायको मिळते आणि संथ नवऱ्याला
उतावीळ बायको मिळते…
व. पु. काळे

मला असं वाटतं ज्यांच्या दुःखावर मला
फुंकर मारायलाही सवड नाही ते दुःख
मी वाचू नये, पाहू नये.
व. पु .काळे

अखंड उत्साह, शोधक नजर
वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस
हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या
गोळ्या खाऊन येत नाहीत.
व. पु .काळे

आपला सहवास सोबतच्या व्यक्तीला
कैद वाटू लागला की, भावनांचे
पाश तोडून त्या व्यक्तीला
मुक्त करणे,
दोघांच्याही हिताचे.
व.पु.काळे

अश्रूंना वाट करून
देण्यासाठी सुद्धा समोर
तशी व्यक्ती हवी.
व पु काळे…

स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं,
उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो.
राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत.
तरी मी त्याला विचारलं….
“स्वप्नांवर माणुस जगतो का रे?”
तो म्हणाला “नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो,
रमतो. पण जाग येईपर्यंत !
जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर
परत झोपण्याची वेळ येते माणसावर “
“मी बुवा स्वप्नांवरच जगतो.
स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फार जवळचा संबंध असतो”
“बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते”
– व.पु.काळे

असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो.
जो उपदेश करणार नाही पण साथ देईल..
जो उणिवा दाखवून देईल पण दोष देणार नाही.
कौतूक करेल पण अहंकार फुलवणार नाही..
भेटेल असा पार्टनर? पण असं भेटेल का म्हणून?
आपणच का नाही तसं व्हायचं?
कुणासाठी तरी अशा स्वरुपाच पार्टनर ?
किती कठीण आहे, आणि सोपंही…
व. पु. काळे

आपल्या स्मृतीतून जो कधी
नाहीसा होत नाही तो अमरच..
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी
वेगवेगळी, प्रत्येकाची अमर माणसं
भेटत असतातच. ती माणसं
आपल्याबरोबरच शेवटचा श्वास
घेतात..
व.पु. काळे

कष्ट अनेकजण
करतात, पण बरोबरीने नशिबाची
साथ असणाऱ्याच्या
घरावरच यशाचं तोरण लागतं..
व. पु. काळे..

आपण फार छोट्या छोट्या प्रसंगांना
‘इज्जत का सवाल’ बनवतो..
आयुष्यभर अकारण इरेला पेटतो..
नशिबाने साथ दिली की ‘जितं
मया‘ करत कॉलर ताठ! फसलो तर
खापर फोडण्यासाठी कुणाला तरी
हेरायचं..
व. पु. काळे..

उत्कष्ट
हे साधेपणाचं लक्षण आहे
फक्त विचार गुतागुतीचे
असतात..
व. पु. काळे

सगळी
दुखणी परवडली
संवादाची भुक ह्या
व्याधी वर उपाय नाही..
व. पु. काळे

लाजावं कसं हे
श्रावण किंवा
भाद्रपदानंच
जगातल्या पहिल्या
तरुणीला सांगितलं..
व. पु. काळे
तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं
यासारख्या यातना नाहीत. पण कुणीतरी
आपली वाट पाहत आहे या
जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या
जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या
पकडतात…
व. पू. काळे
आवडणारी कामचं
वाटणीला येतात असं नाही,
काही कामं कर्तव्य म्हणून
करायची असतात..
– व पु काळे
प्रत्येक प्रांतात आपलं जोडीदाराशी
जमलं पाहिजे, हा अट्टाहास न धरता,
जिथे जमणार नाही, ह्याचा अंदाज
आला, की पान उलटायचं. हाच विचार
पहिल्यांदा पटवून द्यायचा…
व. पु. काळे..
ऐवढ्या मोठ्या जगात
आपली एकही व्यक्ती
नसणे किती त्रासदायक
असते एखाद्या रिकाम्या
डोक्याच्या माणसाला
विचारा..
व. पु. काळे
संवाद साधायला काय लागतं?
भाषा? शब्द? विषय ? निकड ?
नाही नाही या कशाचीच गरज नसते,
आंतरिक जिव्हाळा असेल तर
संवाद कुणाशीही साधला
जाऊ शकतो….
व. पु. काळे
रडणं
भोगायचं
असतं..
हसणं
उपभोगायचं…
व. पु. काळे
निर्माण होणाऱ्या भावना प्रकट
करायच्या नाहीत हे अंगवळणी
पाडून घेता घेता कातडीचं
चिलखत कधी होते हे
स्वतःलाही समजत नाही..
– व. पु. काळे
पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री
आवडते, हा बायकांचा चुकीचा
समज आहे.. आकर्षण आणि
प्रेम या फार वेगवेगळ्या
अवस्था आहेत…!
• व. पु. काळे
प्रवासाला निघालेल्या
माणसाला आपण केवळ
स्टेशनपर्यंतच पोहोचवू शकतो..
पुढचा प्रवास ज्याचा तो
आपल्या हिमतीवर करतो..
व.पु.काळे
प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा
जित्याजागत्या माणसांचा
संवाद संपणं हेच त्याचं खरं
मरण आहे..
व. पु. काळेकोणती फुले
टाळायची…
ते फुलपाखरांना
पण समजतं…
व. पु. काळे
व्ही.पी. काळे यांच्या कोट्समध्ये गुंतलेली प्रगल्भ अंतर्दृष्टी आणि कालातीत शहाणपण आम्ही उलगडून दाखवत असताना या प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा आणि तुमच्यामध्ये आत्मनिरीक्षण आणि प्रेरणेची ठिणगी पेटू द्या.